- रामायण मालिकेचा जागतिक विक्रम !
नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीनंतर दूरदर्शन वाहिनीवर रामायण आणि महाभारत या हिंदी मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येत आहे.
१६ एप्रिल या दिवशी रामायण मालिकेचा भाग तब्बल ७ कोटी ७० लाख लोकांनी पाहिला. हा एक जागतिक विक्रम आहे, अशी माहिती दूरदर्शनने ट्वीट करून दिली. (भारतात आध्यात्मिक मालिका अजूनही लोक आवडीने बघतात, हेच यातून दिसून येते. सासू-सुनांच्या भांडणांच्या निरर्थक मालिका दाखवण्याऐवजी समाजाला दिशादर्शन करणाऱ्या ‘रामायण’ सारख्या मालिकांची आज समाजाला आवश्यकता आहे !