दोन वर्षांपूर्वी विराट का झाला शाकाहारी?

जनदूत टिम    06-Apr-2020
Total Views |
भारताचा कर्णधार विराट कोहली हा दोन वर्षांपासून शाकाहारी आहे, असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण कोहली दोन वर्षांपासून शाकाहरी का बनला, हे मात्र तुम्हाला माहिती नसेल.कोहली हा पंजाबी कुटुंबातील आहे. पंजाबी लोकं ही खाण्याचे शौकिन असतात, असे म्हटले जायचे. दोन वर्षांपूर्वी कोहलीदेखील मांसाहार करायचा, पण सध्या दोन वर्षांपासून तो पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.

virat-kohli_1   
 
ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील. दोन वर्षांपूर्वी भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. याबाबत कोहली म्हणाला की, " जेव्हा दोन वर्षांपूर्वी आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्या वर गेलो होतो तेव्हा माझी पाठ दुखत होती. माझ्या हाडांमधील कॅल्शियम कमी झालेलं होतं. माझं अंग दुखत होतं. त्यामुळे मी रात्रभर झोपूही शकलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा मला समजलं की माझ्या पोटामध्ये युरिन अॅसिड तयार होत होतं. त्यानंतर मी वैद्यकीय उपचार घेतले आणि त्यानंतर मी मासांहार खाणे बंद केले. कोहली पुढे म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी मी मासांहार बंद केला. पण आता मला पूर्वीपेक्षा जास्त चांगलं वाटत आहे. तंदुरूस्तीही चांगली वाढलेली आहे. त्यामुळे शाकाहारी असल्याचे काही फायदेही असतात. माझी पत्नी अनुष्का शर्मादेखील शाकाहारी आहे.