सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा ठाणे
पालघर पतपेढीला पडला विसर!
जनदूत टिम
शहापुर : आपल्या अखंड सेवेत ठाणे पालघर शिक्षक पतपेढीत सभासदत्व असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच आपल्या जमा रकमेचा धनादेश देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र शहापूर तालुक्यात वासिंद केंद्रातील दहागाव येथून २९/०२/२०२० रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका सौ विमल विठ्ठल पाटोळे यांना मात्र हा धनादेश अद्याप प्राप्त झाला नाही. याबाबत चौकशी केली असता त्यांना पतपेढीतून कोणत्याही प्रकारचा फोन किंवा पत्र आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यांनी पतपेढीच्या या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.
एरव्ही निवडणुकीच्या वेळी मते मागणारे आणि मोठ्या अभिमानाने शेवटच्या दिवशी धनादेश घरी किंवा सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाणारे संचालक सुद्धा अजिबात या कार्यक्रमात फिरकले नसल्याचे निवृत्त शिक्षिका सौ विमल विठ्ठल पाटोळे यांनी सांगितले . त्यामुळे निवृत्त शिक्षकाला निवृत्तीच्या दिवशी सन्मानपूर्वक धनादेश देण्याची प्रथा शहापुरात खंडित झाली आहे असे वाटते अशा या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील तमाम शिक्षाकामधुन नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे.