राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जीवनदान अभियान

15 Dec 2020 20:47:29
कल्याण : सद्ध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेले कित्येक महिने महाराष्ट्रातील जनता कोरोना सारख्या भयंकर महामारीशी लढा देत आहे. या लढाईत डॉक्टर रुग्णांना वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
 
ncp54_1  H x W:
 
अशातच आता महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हि कमतरता भरून काढण्यासाठी सरकारच्या वतीने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले . यासाठी नागरिकांना रक्तदान करणे सोपे व्हावे . आणि जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण धोक्यात जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष अप्पा शिंदे कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेल जिल्हाध्यक्ष उदय जाधव यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
 
ंआयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रामदास वाडी परिसरातील सुमारे १०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी आयोजक उदय जाधव यांच्या वतीने रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.
Powered By Sangraha 9.0