१३३ भारतीय नागरिकांची पाकिस्तानातून सुटका

जनदूत टिम    16-Oct-2020
Total Views |
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अडकलेले १३३ भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. येत्या सोमवारी (१९ ऑक्टोबर) नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे.
 
India_pakistan_1 &nb
 
उच्चायुक्त कार्यालयाकडून भारतात परतणाऱ्या नागिरकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये ४ भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळं त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
 
सप्टेंबर महिन्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं ‘३६३ नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि ३७ भारतीय नागरिकांसह एकूण १३३ नागरिकांना भारतात परत पाठवणार आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचं ट्विट पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं १५ ऑक्टोबरला ट्विट केलं होत. त्यामध्ये ‘३६३ नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसा धारक आणि ३७ भारतीय नागरिकांना भारतात जाण्याची सुविधा देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
१३३ नागरिकांच्या यादीत ज्या भारतीयांचा समावेश आहे त्यांना १९ ऑक्टोबरला वाघा-आटारी बॉर्डरवर पोहोचण्याचे आदेश भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात
आल्या आहेत.