🏭💰 अदानीसाठी मणिपूर घडत आहे 💰🏭

एखादा सत्ताधारी पक्ष आणि देशाचा प्रधानमंत्री सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या कारखानदार मित्राला फायदा पोचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर...

हरिश म तायडे    28-Jul-2023
Total Views |

अदानीसाठी मणिपूर घडत आहे 
 
काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया.
१. किरण रिजिजू जे आधी कायदेमंत्री होते त्यांना भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले, हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे म्हणजे नॉर्थ ईस्टचे.
 
२. २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली अमूल्य खनिजे असल्याचा सर्वे समोर आला होता.
 
३. २०१७ मध्ये मणिपूर मध्ये भाजपचे बीरेन सिंग चे सरकार आले आणि लगेचच अडाणी आणि कंपनीने तिकडचे खनिज पट्टे बोली लावत नावे करून घेतले.
 
४. कुकी आदिवासीच्या ताब्यात असलेली जमीन फक्त आदिवासीच खरेदी करू शकतो आणि त्याची संमती नसेल तर तिथे उद्योग सुरु होऊ शकत नाही.
 
५. बिरेन सिंग मैतेइ जातीतून येतो, हा समाज शेती करतो, उद्योग-व्यवसाय करतो, संपन्न अशा समाजाला 'आदिवासी' घोषित करण्यासाठी वेगवेगळे सर्वे घडवून आणले गेले.
 
६. सर्व्हे करतांना कुकी वस्त्या वेगळ्या आहेत त्यांना मार्क केले गेलेच होते पण जिथे मिश्र वस्त्या होत्या तेथील कुकी घरांवर गुलाबी रंगाने मार्किंग करून ठेवले.
 
७. मार्च महिन्याच्या सुमारास एक आदेश काढून सर्व कुकी जमातींना त्यांच्याकडील लायसन्स आर्म शासनाकडे जमा करण्यास भाग पाडले.
 
८. हायकोर्टाने केंद्र शासनाच्या अधिकारांवर अतिक्रमण करत, गतिशीलता दाखवत स्वतःच मैतेइ जातीला 'आदिवासी' असल्याचे घोषित केले.
 
कुकी जमातीने त्याला विरोध केला, 3 मे रोजी आंदोलन आयोजित केले,मैतेइ पूर्ण तयारीत होते याचा विरोध करायला. आंदोलन संपवून परत जाणाऱ्या कुकिंवर शसस्त्र हल्ले केले गेले, त्यांचे स्मारक ध्वस्त केले गेले,
 
दिल्लीतला एक जुना व्हिडिओ मोर्फ करून 'कुकींनी मैतेइ मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल करून आग भडकविण्यात आली आणि मग सुरू झाले सरकार पुरस्कृत मास किलिंग.
 
पोलीस अकॅडमी व विविध पोलीस स्टेशनवर हल्ला करून जमावाने AK45 व इतर आधुनिक हत्यारे पळवून नेल्याची स्क्रिप्ट व्यवस्थित प्रत्यक्षात आणून घेतली व तसं न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देशाला सांगून टाकलं.
 
पाठोपाठ इंटरनेट बंद करून तेथील काहीही सत्य बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली.
केंद्रातून पॅरामिल्ट्री मागवली जी कुकी आदिवासींना संरक्षण करण्याऐवजी मैतेइ वस्त्यांवर संरक्षणार्थ लावून स्थानीक पोलिसांना मैतेइ अतिवाद्यांसोबत आदिवासी कुकी वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी पाठविले. नुसत्या बंदुका नाही तर रासायनिक विस्फोटकांचे साठे करून मैतेई अतिरेकी कुकींच्या समूळ नायनाट करण्याच्या तयारीत आहेत. बीरेन सिंग व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूढील सगळी योजना फुलप्रूफ तयार ठेवली आहे, कुठेही काहीही बभ्रा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे.
 
शेकडो गावं, वस्त्यामध्ये जाऊन मैतेइ खुलेआम कत्तली करत सुटले. १० वर्षाची मुलगी असो वा ६० वर्षाची म्हातारी त्यांना सामूहिक बलात्कार करून खून केले, माणसांची मुंडकी कापून वस्त्यांच्या मध्यभागी खुंटीवर टांगून ठेवली आणि गावं-वस्त्या जाळून राख केल्या. रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येनं प्रेत ताठरून, सडून पडली आहेत, आणखीही बरंच काही आहे जे समोर यायचं आहे.
 
जेसीबी ने मोठाले खड्डे खोदून शेकडो कुकी गाडून टाकले गेले आहेत आणि ही सर्व गावं आता मैतेईंच्या ताब्यात आहे, उद्या त्यांच्या नावे पण केली जातील.
 
मग सरकारी सोपस्कार पार पाडून हे सर्व डोंगरपट्टे अदानीला दिले जातील आणि सुंदर असा नॉर्थ ईस्ट केजीएफ च्या खदानी सारखा होणार आहे, जिथे कुकी आदिवासी गुलाम म्हणून राबवले जातील, शोषित होतील आणि किड्या मकोड्यांसारखे मरतील.
येत्या काही दिवसांत तिकडचे अनेक व्हिडिओ, फोटो समोर येणार आहेत जे आपल्याला माणूस म्हणवून घेण्याची लाज आणणार आहेत.
 
सरकार दरबारी राबणारे न्यूज चॅनेल आणि भक्त यांपैकी कशालाच भीक घालणार नाही उलट बांग्लादेशी मुस्लिम, पाकिस्तान व चीन असे काय काय अँगल लावून जे झालं ते योग्यच झालं आहे याबद्दल मोठमोठ्या पोस्ट, रकाने लिहतील, आपण ते वाचायचं आणि षंढ बनून गप्प बसायचं...त्या कुकींच्या लाईनीत आपला नंबर येईपर्यंत..