कॉम्पुटर आणि स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?

जनदूत टिम    27-May-2023
Total Views |
   अमेरिकेत देव नाही,ना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.कुठले होमहवन नाही,ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही,ना अनुष्ठानं नाही.हरिनाम सप्ताह नाही,ना पारायणे नाहीत.अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत,कशाचीच कमतरता नाही.माणशी 2876 वृक्ष आहेत.भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत. आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे असे म्हटल्या जाते.पण एकही भारतीय झाड लावत नाही.विशेष उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा आणि त्या झाडाला जपत सुद्धा नाहीत.अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं एक ही घर किंवा बंगला दिसणार नाही. त्यांनी घरा घरात कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईल वापर करून जग जवळ आणले आहे 
 
MO..
 
भारतात बहुसंख्ये लोकांच्या दारात झाड नाही.तर फार हिरवळ कुठली?.स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली.साधं पिण्याच शुद्ध पाणी देवू शकत नाही.सर्वच देवाच्या भरोशावर आणि सरकारच्या मर्जीवर अवलंबून. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे.आणि लोकसंख्या आहे 31 कोटी. तर भारताची आहे 135 कोटी.35 कोटीची 135 कोटी झाली. फक्त 80 वर्षात.एवढीच जबरदस्त प्रगती आहे. इथे हजारो जाती,सतराशे साठ धर्म. कुणाचाच कोणाला मेळ नाही.प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा.आणि तरी योग्य वेळी सर्वच म्हणतात "गर्वसे कहो हम हिंदू है!." आणि देवाच्या आरत्या स्मार्ट मोबाईलवर होत आहेत.
एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले.तरी एकएकाला 4-5 लेकरं.कुत्र्यावाणी भटकत आहेत रस्त्यावर,ना शिक्षण ना संस्कार.ना आचार,ना शिस्त,सगळं बिनधास्त. आणी मस्त. आताच पिण्यास पाणी नाही. तर पुढे काय?. कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही.निसर्गाची चाड नाही.नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत. तेहतीस कोटी देवाचे नांव घेऊन प्रार्थना केल्या जात आहेत.ईश्वराशिवाय कुणी महान नाही.हे ऐकुण ऐकुण हजारो वर्ष झाली.दरवर्षी तेच. पाऊस नाही पडलाच तर पिकाला भाव नाही.शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो. नाही पडला तरी आत्महत्या करतो.सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता आरक्षण शंभर टक्के होण्याची वेळ आली. ज्यांचे सर्वच क्षेत्रात शंभर टक्के आरक्षण आहे तोच इतरांना काही मिळनार नाही.अशी यंत्रणा उभी करते. म्हणूनच कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईल मुळे माणस स्मार्ट झाली का ?.असा प्रश्न उभा राहतो.

MO.. 
 
वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत सांगीतले देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या,सहाकोटी लोक बेरोजगार झाले. नोकरयांच नाही.तर आरक्षण घेवून काय चाटायचे. आता नोक-याच बंद होत आहेत.आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद नाही.मॅचच फिक्स असेल.तर खेळायचेच कशाला.जनता दिशाहीन झाली आहे.स्वप्न राखेत मिसळली आहेत.संविधान नावांला उरले आहे.प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे.तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे.दवाखाने कुटूंबाचे दिवाळं काढत आहे.जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे.तीस टक्के लोकांना रक्तदाब आहे. शेतात काम करायला मजूर नाही.अंगमेहनतीला माणुस नाही.सगळे बिनकामाची माणसं आहेत.गावा गावात कॉम्पुटर वायफाय स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ येत आहे.आणि माणसातील माणुसकी दूर जाता आहे.नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत.स्वयंपाकाला बाई,भांडी व धुण्याला बाई. तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.

MO.. 
 
कुंभ मेळ्यात दहा हजार सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली होती. आणि आता रस्त्यावर भटकत आहेत.विरक्त झाले आहेत.लग्नाचे वय टळून गेले आहे.बायका मिळत नाहीत.गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं पोरी बिन लग्नाची आहेत.भयंकर विदारक परिस्थिती आहे.स्मार्ट मोबाईलवर मैत्री जुळते आणि तुटते त्यामुळे जग जवळ येत आहे असे म्हणतात.जगातील वेगवेगळ्या देशाची माहिती मिळत आहे.पण तिकडे रीतीरिवाज परंपरा नाहीत,तर दिवसागणिक नवीन शोध घेऊन आचरण आहे.त्यामुळेच स्मार्ट मोबाईल वेगवेगळ्याप्रकारांचे बनविल्या जातात.किती ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी, एरोस्पेस अभियांत्रिकी आणि नौदल आर्किटेक्चरसह, वाहन अभियांत्रिकीची एक शाखा आहेत, ज्यामध्ये यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक,सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अभियांत्रिकीचे घटक समाविष्ट आहेत जे मोटरसायकल,ऑटोमोबाईल्स आणि ट्रक आणि त्यांच्या डिझाइन, उत्पादन आणि ऑपरेशनवर लागू होतात.आपल्याकडे सुद्धा हे कॉम्पुटर वायफाय,स्मार्ट मोबाईल आधुनिक तंत्रज्ञान आले आहे.पण त्याची सत्यनारायण महापूजा घातल्या शिवाय ते चालू करणे मोठा अलिखित अपराध आहे.म्हणूनच देशातील माणसं कॉम्पुटर वायफाय, ३ जी ,४ जी स्मार्ट मोबाईल वापरून स्मार्ट झाली नाही.रीतीरिवाज परंपरा त्यांना हे करायला मुभा देते पण अट एकच असते त्याची सुरवात भटा ब्राम्हणांच्या हस्ते पूजा दक्षिणा देऊन झाली पाहिजे.
 
बाराही महिने बाजारात फळे बळेच पिकवून विकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत.मुलांना धड इंग्रजी येत नाही.आणि मराठी येत नाही.मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत.टिव्ही वरच्या मालिका फालतू झाल्या आहेत.महिला गुन्हेगारी वृत्तीच्या जास्त दाखवत आहे.मुलं लहान पणा पासूनच हिसंक होत आहेत.13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत.सरकारने कायदा काढला होता,१८ वर्षा नंतर लग्न झाले पाहिजे.आता त्यात बदल करून मुलामुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे केले.मुलमुली १४/१५ वर्षाची झाली की लग्ना नंतर जे करायला पाहिजे ते सर्व अगोदर करून मोकळे होत आहेत.त्यामुळे आईवडील भावांना जातीची खानदानची इज्जत गेल्याचे वाटून खून करण्यात येत आहे.कायदे अनेक आहेत पण अंमलबजावणी प्रभावीपणे नाही. कारण स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत असले तरी माणसं स्मार्ट बनतांना दिसत नाही.
 
देशात दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.ती घेणे प्रतिष्ठेची झाली आहे.आणि प्रार्थना स्थळे बहुजन समाजाला लुटीची ठिकाणं झाली आहेत.वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.आईला बाळासाठी वेळ नाही.पाळणाघरे वाढत आहेत. लेका-सुनांना सासुसासरे नकोत.अनाथालये वाढत आहेत. माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत. खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे.सज्जनांना वेडयात गणले जात आहे.धर्मसत्ता आणि राजसत्ता हेच अधिकृतरीत्या करीत आहे.
 
लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे.चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत. प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.तरी आज काही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.तर काही सुना सासु सासऱ्यांना घराबाहेर काढत आहेत.समाज व समाजातील वरिष्ठ नागरिक मजा पाहत आहेत.समाजाची भिती राहिल्या नसल्यामुळे लोकलज्जा राहिली नाही. एकंदरीत भारत विस्फोटाच्या व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे.भारत मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालला आहे.वेळीच सावरलो नाही.तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे.हे मात्र नक्की.स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ येत आहे तर नातेवाहिक दूर जात आहेत.म्हणूनच देशातील माणसं कॉम्पुटर वायफाय ३ जी ,४ जी स्मार्ट मोबाईल वापरून स्मार्ट झाली पाहिजे.भय,भिती आणि भूक रीतीरिवाज परंपरा जो पर्यंत सोडून देत नाही. तो पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून कायम आचरणात आणले जाणार नाही.आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून आचरणात आणले तर भय,भिती आणि भूक मिटून जाईल.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.