संपूर्ण देशातून काँग्रेस पक्ष तर्फे कोकणात पूरग्रस्त साठी मदतीची ओघ मोठया प्रमाणे वाटप.' नाना पटोळे

नरेश पाटील    05-Aug-2021
Total Views |

माणगांव : नुकताच कोकणावर आलेल्या मोठी संकट बद्दल बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे यांनी निदर्शनास आणून दिले कि या समयी पूरग्रस्त पीडित यांना काँग्रेस पक्ष तर्फे मोठी मदत नुसता राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशातून होत असल्याचा प्रतिपादन माणगांव शहर येते राजीपाचे माजी सभापती तथा रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या ज्ञानदेव पोवार यांचा निवासस्थानी येते बुधवार दि.04 ऑगस्ट रोजी उपस्थित कार्यकर्ते समोर व्यक्त केले.


nana_1  H x W:
 
या समयी नाना पटोळे सोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेस सचिव श्री. शिंदे,काही पदाधिकारी,रायगड जिल्हा माजी काँग्रेस अध्यक्ष आर.सी.घरत,विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष श्रद्धा ठाकूर,माजी नगरसेविका सौं.अंजली ज्ञानदेव पोवार,सचिव डॉ. नरेंद्र सिंह,माणगांव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील ईतर अध्यक्ष, पदादिकारी, माणगांव शहर अध्यक्ष सुनील दत्त चव्हाण सह स्थनिक काँग्रेस पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
 
सुरुवातीला माणगांव ता. अध्यक्ष विलास सुर्वे यांनी सर्व मान्यवरांचा मौकिक स्वागत केले तर जिल्हा काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे यांचा सह सर्व प्रमुख पाहुणे यांना शॉल देऊन स्वागत केले. नाना पटोळे यांनी या प्रसंगी बोलताना म्हणाले. काँग्रेस पक्ष पूरग्रस्त मदतीचा विषयात कधीही प्रसिद्धी कडे वळले नाही. ईतर काही जे निदर्शनास आले आहे.पूरग्रस्तसाठी आलेल्या मोठी मदतवर आपले लेबल लावून मोठी प्रसिद्धी करत आहे.याची उत्तम उदहारण म्हणजे महाड टोल नका येते मोठी कमानी लावून सर्व आलेल्या पूरग्रस्थाचे मदत त्या ठिकाणी जमा करून आपण पूरग्रस्त यांना देत आहोत असे होत असल्याबद्दल तक्रारी आपला कडे आल्या बद्दल नाना पटोळे यांनी या वेळी अवर्जून सांगितले.काँग्रेस पक्ष असा प्रसिद्धी कडे कधीही लक्ष देत नाही.
 
पूरग्रस्त पीडित यांना जास्तीत जास्त कसा मदत होईल त्याकडे नेहमी प्राधान्य देत असतो. पुढे नाना भाऊ यांनी या वेळी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज चेहरे आम्ही गमावले आहे. जेष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार मधुकर ठाकूर आणि माजी आमदार तथा राज्य काँग्रेस उपाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या दुःखद निदनपर शोक व्यक्त केले.या दुःखद प्रसंगी नाना पटोळे यांनी स्वागतीचे पुसप गुच्छ स्वीकारले नाही.काँग्रेस पक्ष या प्रसंगी शोक वातावरणात आहे.
 
महाड, पोलादपूर आणि चिपळूण येते पूरग्रस्त जनते साठी जास्तीत जास्त मदत होण्यासाठी केंद्रित केले आहे. काँग्रेस पक्ष ही त्यागाची पक्ष आहे.पीडित ग्रस्त यांना प्राधान्य मदत म्हणून फार मोठ्ठया प्रमाणाने संपूर्ण देशातून मदत आणून पीडित पर्यंत पोच करीत आहे.तरी सर्व कार्यकर्तानी योग्य समन्वय साधून तसेच नियोजन आखून व्यवस्तीत वाटप पूरग्रस्त यांना करावे असे सांगून आपल्या भाषण संपविले.