मच्छीमारांच्या मदतीसाठी राज्यपालांना साकडे

जनदूत टिम    26-May-2021
Total Views |

  • आमदार रमेश पाटील यांनी राज्यपालांना भेटून दिले निवेदन

नवी मुंबई: मागील वर्षीच्या निसर्ग वादळात मच्छीमारांची वाताहत झली होती.त्यातच दहा दिवसापूर्वी येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादलाने पाच जिल्ह्यातील मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.त्यातच कोरोनाच्या संसर्गाने आधीच कंबरडे मोडले आहे.जर वादळाने बाधित झालेल्या मच्छीमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाहीतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला आपण योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी याना राजभवन(ता.25) येथे भेटून निवेदन दिले.
 
rameshdad4a_1  
 
कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते वादळाने ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील हजारो मच्छिमार बांधवांचे सुमारे 250 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मागील वर्षी निसर्ग वादळात 2100 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यावेळी फक्त सहा जिल्ह्याला शासनाच्या वतीने 65 कोटी रुपये इतकी तोकडी मदत दिली होती.त्यामुळे बऱ्याच मच्छीमाराना मदत पोहचली नाही.विशेष म्हणजे स्थळ पंचनामा करून देखील मदत पोहचली नसल्याने त्यांच्यात आजही नैराश्य असल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी निसर्ग वादळात ज्या प्रकारे मच्छीमारांना मदतीचा हात दिला.त्याच प्रकारे तौक्ते वादळाचा फटका बसणाऱ्या मच्छीमाराना मदत केली जाईल असे दूरचित्रवाणी वरून मुख्यमंत्र्यांचे मत समजले.परंतु निसर्ग वादळात दिलेली तुटपुंजी आर्थिक मदत अजूनही शेकडो मच्छीमारांना मिळाली नाही.मग तौक्ते वादळातील मदत कधी मिळेल.शासनाने एक प्रकारे मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.म्हणून तौक्ते वादळात बाधित झालेल्या मच्छीमारांना समाधानकारक आर्थिक मदतीसाठी आपण पुढाकार घ्यावा असेही निवेदनातून अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
शासनाकडे प्रलंबित असलेला डीझेल परतावा तात्काळ मिळावा,मृत्यू पावलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबांना व बोट नष्ट झालेल्या धारकांस प्रत्येकी पाच लाख रुपये,घरांचे नुकसान झालेल्या व्यक्तींना 25 हजार व बोटीचे थोडेफार नुकसान झालेल्या बोट मालकांना 50 हजार रुपये देण्यात यावेत.
- रमेश पाटील,आमदार,विधानपरिषद,महाराष्ट्र