निसर्ग चक्रीवादळ बाधित मच्छीमार दुर्लक्षित : रमेशदादा पाटील

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |

- निसर्ग चक्रीवादळ बाधित कोळीवाड्यांचा कोळी महासंघाचा पाहणी दौरा

मुंबई : रायगड, रत्नागिरी किनाऱ्यावर प्रघात केलेल्या निसर्ग चक्रीवादळाने भयंकर असे नुकसान केले आहे या नुकसानीचे शासनामार्फत पंचनामे केले गेले मात्र हे पंचनामे करताना मच्छीमार गाव आणि मच्छीमारांचे नुकसान डावलले गेले असल्याचे मत विधान परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी येथे व्यक्त केले.
 
Rameshdada Patil_1 &
 
राज्याच्या किनाऱ्यावर नुकतेच आलेले निसर्ग या चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटील यांनी शिष्टमंडळासह नुकतेच बाधित कोळीवाडे आणि मच्छीमार गावांची पाहणी केली
रायगड मधील निडी, खारआपटी, रोहा, तळा, रहाताड,मांदाड, मुरुड, मजगाव, बोरली, कोरले, रेवदंडा,साळाव आदी गावांची पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी चर्चा केली.
 
वादळी लाटांनी मासेमारी नौकांमध्ये पाणी भरल्याने इंजिनाचे झालेले नुकसान, होड्या एकमेकांवर अथवा किना-यावर आढळून मोठे नुकसान झाले आहे, वादळापूर्वीची समुद्रात टाकलेली जाळी पुन्हा परत आणू न शकल्याने, जाळी वाहून गेल्याचे पंचनामे अथवा किनाऱ्यावर शाकारुन ठेवलेल्या नौकांवरील बंदिस्ती उडून गेल्याने झालेले नुकसानीचे, घरातीचे छत आणि कौलेउडालल्याने पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीचे झालेले नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचे निदर्शनास आणले आहे,
निसर्ग प्रकोप होऊन देखील १८ दिवस झाले तरी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असून कोणत्याच गावाला वीज पुरवठा आणि पाणीपुरवठाही होत नसल्याने दूषित पाणी पिल्याने तापाची साथ काही गावांमध्ये पसरत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य अधिकाऱ्यांची पडलेली निवासस्थाने, मुरुड येथील मासळीबाजार तात्काळ उभा करण्याची मागणी पाटील यांनी केली.
 
मासळीचा दुष्काळ अथवा चक्रीवादळ मध्ये झालेले मच्छीमारांचे नुकसान असो यामध्ये नेहमी शासन कोळी समाजावर अन्याय करीत असल्याचा आरोप श्री पाटील यांनी यावेळी केला. या पाहणी दौऱ्यात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्यासोबत सरचिटणीस राजहंस टपके, युवा अध्यक्ष अँड चेतन पाटील, प्रा अभय पाटील, उल्हास वाटकरे ,गणेश पिठे अॅड यशवंत साधु आदी मान्यवर या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.