लॉकडाऊमचे कारण देऊन मराठी माणसांना नोकरीवरून काढून टाकणाऱ्या उद्योजकांविरोधात तक्रार करण्यासाठी हेपलाईन क्रमांक उपलब्ध करून द्यावा आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
ठाणे : लोकडाऊन च्या काळात उद्योगपतींना, बिल्डरांना व इतर व्यावसायिकांना त्यांच्या कंपनी किंवा आस्थापनांन मधल्या कामगारांना माणुसकीच्या दृष्टीने सांभाळून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले होते या तमाम मंडळींना केले होते. टाटा, अंबानी सारख्या अनेकांनी आपल्या संवेदनशील मनातली भावना ओळखून माणुसकीचे दर्शन घडवले. परंतु काही निगरगट व्यापाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ डोळ्या समोर ठेऊन, वर्षीनुवर्षं त्यांच्या उद्योगांना मोठं करण्यासाठी झिजणाऱ्या मराठी माणसांना इतक्या कठीण काळात वाऱ्यावर सोडून तडकाफडकी कामावरून कडून टाकण्याचं पाप सुरु केलंय. अशा व्यापाऱ्यांविरोधात तकार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
 
Pratap-Sarnaik_1 &nb
 
मुंबई महाराष्ट्रा च्या जिवावर स्वतःचं बलाढ्य साम्राज्य निर्माण करायचे आणि कठीण काळात ज्या मराठी माणसाच्या घामाने हे सर्व वैभव उपभोगतोय त्याला एका झटक्यात वाऱ्यावर टाकायचे अशी वृत्ती काही उद्योगपतींची झाली आहे. त्यांना वेळीच अंकुश घालणे महत्वाचे आहे. ओबेरॉय बिल्डरच्या बाबतीतही अश्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असून असे अनेक बिल्डर आहेत जे कुठलीही पूर्व कल्पना न देता, फोन वरून तुम्ही उद्यापासुन येऊ नका असे सांगत आहेत. यामुळे मानसिक धक्का बसून अनेकजण बेजार झाल्याचे प्रताप सरनाईक यांनी निवेदनात म्हटले आहे. मुलांचं शिक्षण, कर्जाचे हफ्ते, घर खर्च आणि पुढे अंधकार. यामुळे त्यांची कुटुंब जबरदस्त धक्क्यात आहेत. मराठी माणुस भावनिक व हळव्या मनाचा आहे. भविष्यत देव न करो, पण हें सर्व सहन नं झाल्यामुळे नैराश्येतून आत्महत्येची पाऊल उचलली जाऊ शकतात. त्यामुळे हें थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
 
लोकडाऊन मुळे निश्चितच उद्योगासह सर्वच क्षेत्राला जबरदस्त आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक दडपण आहेत. हि बाब जरी सत्य असली, तरी कामगारांना कामावरून अश्याप्रकारे काढून टाकणे हा त्यावरचा उपाय असु शकत नाही. आयुष्याची २०- २५ वर्ष एखाद्या कंपनी साठी स्वतःची निष्ठा वाहुन काम करणारा कामगार नक्कीच अश्या कठीण परिस्थितीत आपल्या कंपनीला होणार जबरदस्त आर्थिक नुकसान जाणतो. त्यावर काही मार्ग काढण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणे महत्वाचे असल्याकडे प्रताप सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे,. मोठ-मोठ्या संकटांचे मार्ग चर्चेतुन निघू शकतात. उदाहरण - पस्थितीच गांभीर्य ओळखुन तात्पुरतं काळासाठी कमी पगारात होऊ शकत का ? अथवा काही महिन्यांसाठी सामोपचाराने ब्रेक देऊ शकतो का ?? असें अनेक मार्ग आहेत.
 
अर्थात कामगारांशी चर्चा करून आणि दोघांच्या संमतीनेच यातून मार्ग काढता येईल असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले असून नोकरी वरून काढून टाकणे हें स्थानिक मराठी माणसांवर अन्याय आहे आणि आपण सर्व उद्योगपतींना, बिल्डरांना, मॉल मालक, व्यावसाईक इद्यादी सर्वांना मुख्यमंत्री योग्य ते निर्देश देतील याची खात्री असल्चे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.. तसेच इतकं करूनही पुन्हा या सर्वांनी मराठी माणसांना नोकरी वरून काढण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलाच, तर असल्या व्यापाऱ्यांची तक्रार करण्यासाठी अन्यायग्रस्तांना शासनाच्या वतीने एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध व्हावा. जेणे करून असल्या व्यापाऱ्यांवर त्या माध्यमातून कडक कारवाही होईल, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सोबत पत्राची प्रतही जोडत आहोत.