वासिंद : दि. २२/०३/२०२० पासून कोरोना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात lock down घोषित केल्यामुळे रोजगार नसल्याने गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या गरीब लोकांना मदतीचा हात म्हणून रविवार दि. ०५/०४/२०२० रोजी वासिंद व्यापारी मित्र मंडळाने वासिंद व परिसरातील तसेच वांद्रे (पिवळी)येथील आदिवासी १५० गरजू लोकांना प्रत्येकी (५ किलो तांदूळ,१ किलो, तूरडाळ,१ ली. तेल,१ किलो कांदे,१ किलो बटाटे,१०० ग्रॅम मसाला,१०० ग्रॅम हळद,१ साबण ,१ मिठपुडी) असे किराणा सामान API. योगेश गुरव साहेब व सहकारी या पोलिसांमार्फत वाटप करण्यात आले.