वासिंद : साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शहापुर तालुक्यातील गरजु व्यक्तींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. लॉकडाऊन नंतरही शहरी भागातुन चालत आपापल्या गावी जायला निघालेल्या हायवेच्या बाजुला, झाडाखाली विश्रांती घेत बसलेल्या कुटुंबाना देखील जेवण देण्यात आले. त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले.
वासिंद जवळील बामणपाडा, आसनगाव जवळील जोंधळे कॉलेज हायवे पुल, किन्हवली रोड वरील कुटुंबांना जेवण देण्यात आले. तसेच शहापुर तालुक्यातील शासकीय आपत्ती व्यवस्थापन टीमला ५० जेवणाची पाकीट देण्यात आली. जेणेकरून कसारा घाटापर्यंत जे गरजु लोक आहेत. त्यांच्या पर्यंत खऱ्या अर्थाने जेवण पोहचेल. यावेळी साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत शेलार, संदीप शेलार, अवि शेलार, रोहन शेलार, योगेश कथोरे, मयुर शेलार,रोहित भोईर आणि दैनिक पुढारीचे पत्रकार कृष्णा शेलार उपस्थित होते.