दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी मार्क देणार ?

जनदूत टिम    10-Apr-2020
Total Views |
मुंबई : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन मुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे,तो न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली आहे.सदर प्रकरणी येत्या ४ दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
 
Exam_1  H x W:
 
राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे खबरदारी म्हणून इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून पेपर केव्हा घ्यावयाचा याचा निर्णय घेण्यात येणार होता.आता तर लॉक डाउनमुळे व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्य सुद्धा नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी भूमिका माजी मंत्री आ . मुनगंटीवार यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली.या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले असे मुनगंटीवार यांनी सांगितले.