भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल!

जनदूत टिम    05-Mar-2020
Total Views |
 
final_1  H x W:
 
सिडनी: आयसीसी टी-२० महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा ५ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलिया संघाने २०१० पासून प्रत्येक अंतिम फेरीत खेळली आहे. २०१६ मध्ये त्यांचा वेस्ट इंडिजने पराभव केला होता. तर २०१८ मध्ये इंग्लंडचा पराभव करत त्यांनी चौथे विजेतेपद पटकावले होते. गेल्या २१ फेब्रुवारी रोजी आयसीसी टी-२० वर्ल्ड कपला सिडनी येथून सुरूवात झाली होती. स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आता या स्पर्धेतील अंतिम सामना पुन्हा या दोन्ही संघांमध्ये होत आहे. भारताने पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव करत धक्का दिला होता. त्यानंतर भारताने एकापाठोपाठ एक शानदार खेळी करत अंतिम फेरी गाठली.