कोयत्याची व्यथा ऊसतोड मजुरांचा आक्रोश कुणी ऐकेल का?

जनदूत टिम    29-Mar-2020
Total Views |
पोटाची खळगी भरण्यासाठी दुष्काळानं होरपळलेल्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हा पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक याठिकाणी ऊसतोडणीसाठी आहे,मात्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये आज संपूर्ण भारत ठप्प झालेला असताना आजही कोयत्याचा आणि उसाचा आवाज येत आहे या ऊसतोड मजुरांच्या बाबतीत कोणी विचार करणार आहे की नाही माणसाला पोट महत्त्वाचं असतं, तसा जीवही महत्वाचा असतो, टाटा, बाटा, आदानी, अंबानी, आयटी सगळेच उद्योग बंद केलेत, एवढेच नाही तर ज्या शासकीय कार्यालयात १० कर्मचारी काम करतात ते कार्यालये आज बंद आहेत मग ऊसतोड मजूर हे काय अमृत पिऊन आलेले आहेत का त्यानां कोरोना होणार नाही? मान्य आहे उत्पादक शेतकऱ्यांच नुसकान होणार आहे ऊस जळून जाणार आहे मात्र आज सर्व शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे यामध्ये द्राक्ष उत्पादक असेल तरबूज खरबूज, फुले उत्पादन करणारे शेतकरी भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी हे सर्वजण अडचणीत आहेत आणि संकटात आहेत एखाद वेळेस आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेतामध्ये झालेल्या पिकांचे नुकसान भरून येईल मात्र या गोरगरीब ऊसतोड मजुरांचा जीव गेला तर तो परत येणार आहे का याचाही विचार माणूस म्हणून आपण केला पाहिजे तुम्हाला कारखाने चालवायचे असतील तर हार्वेस्टर न तुमचे कारखाने चालू ठेवावेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी सरकारने स्वतंत्र पॅकेज दयावे.

Usetodi_1  H x
 
मात्र आमच्या गोरगरीब ऊसतोड मजुरांच्या जीविताशी खेळ खेळू नये! जर एखादा ही कोरूना चा रुग्ण आढळला तर बीड उस्मानाबाद अहमदनगर लातूर परभणी जालना या जिल्ह्यातून जाणाऱ्या गावागावातील ऊसतोड मजुरां द्वारे हा विषाणू अख्ख्या महाराष्ट्राला विळखा घालेल हा धोकाही लक्षात घ्यावाऊसतोड मजुरांच्या नावावर आपल्या राजकारणाची पोळी भाजणारे नेते कुठे आहेत असा सवाल आज ऊसतोड मजुरांमध्ये केला जात आहे इकडे कोरोना सारख्या संकटाने जग भयभीत झाले आहे मात्र आजही ऊसतोड कामगार ऊस तोडणीच्या फडातच आहेत.साखर कारखानदारी जगवण्यासाठी आणि साखर सम्राटांच्या फायद्यासाठी ऊस तोडणी करतच आहेत याकडे मात्र लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही, अनेक पिढ्या ज्यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर राजकारण केले. ते आज मुग गिळून गप्प आहेत, आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब असते तर या ऊसतोड मजुरांसाठी थेट फडांमध्ये गेले असते, कुठल्याही पोलिसांनी दादागिरी न करता हे उत्तर मधून गावी पोहोचले असते तोपर्यंत साहेब शांत बसले नसते मात्र आजच्या राज्यकर्त्यांना ताई, भाऊ, आक्का, दादा आणि साहेब" यांना कुणालाही देणे-घेणे राहिले नाही.
संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन आहे रस्त्यावरती फिरू देणेही मुश्कील चार बंदी जमावबंदी आहे त्याठिकाणी ऊसतोड मजूर आजही ऊस तोडणीचे काम करत आहेत विशेष म्हणजे यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे आरोग्याच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे उपाय साहित्य कारखाना व्यवस्थापनाने दिली नाहीत,विशेष म्हणजे ऊसतोड मजुरा बाबतीत बोलणारे, कारखानदारां सोबत साटेलोटे करणारे, ऊसतोड मजुरांचे नेते नव्हे तर ऊसतोड मजुरांच्या वड्यावरच लोणी खाणारे कुठे गायब झाले हे समजतही नाही, एसीच्या रूम मध्ये बसून ऊसतोड मजुरांच्या बाबतीमध्ये गप्पा मारणाऱ्यांना ऊसतोड मजुरांच्या महिलांचा आक्रोश समजून घ्यावा आपण आपल्या लहान मुलांसोबत गप्पा मारत बसलेलो आहोत मात्र ज्यांची मुलं उपाशीपोटी आज गावांमध्ये आहेत आणि ऊसतोड मजूर कुटुंब मात्र फडांमध्ये कोसोदूरवर आहे ते त्या ठिकाणी अडकून पडले तर इकडं मुलांचीही पंचाई त आहे, याबाबत मात्र अद्याप पर्यंत कुठल्याही नेत्याने फडामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले नाहीत,
मेळावा असो किंवा सभा असो ही ऊसतोड मजूर फक्त प्रेक्षक म्हणून तुम्हाला चालतात मात्र त्यांच्या जीविताला प्रश्न येतो त्यावेळी कोणीच का बोलत नाही ऊसतोड मजूर महामंडळ हे फक्त नावालाच आहे का? कुठला ऊसतोड मजुरांचा विमा काढलेला आहे? हे तरी माहित आहे का! उद्या कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने जर या ऊसतोड मजुरांच्या जीवितास काही बरं-वाईट केलं तर जॉब विचारायचा कुणाला कारखानदार मुकादम का नेते या बाबतीतही उत्तर कोण देणार ! आहे की नाही खरा प्रश्न तर हा आहे. इथल्या स्वार्थी प्रवृत्ती मग भलेही ते कारखानदारांची असो किंवा या नेत्यांची असो त्यांना फक्त ही माणसं वापरायला हवी असतात हवं तसं काम करून घ्यायचं दुर्दैवानं अपंग झालं, झालं कुणी मरण पावला, तर तुटपुंजी मदत द्यायची आणि गप्प बसायचं हे किती दिवस चालणार आहे आज विषय महत्त्वाचा आहे लोक जीव मुठीत धरून घरामध्ये बसले असताना दुसरीकडे ऊसतोड मजूर हे आजही पोटाचा चिमटा काढून खळगी भरण्यासाठी फडामध्ये राबराब राबत आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना धनंजय मुंडे यांच्याकडून ऊसतोड मजुरांना खूप मोठी आशा आणि अपेक्षा होती, मात्र त्यांच्याकडूनही आज कारखानदारांच्या दबावापोटी हवे तेवढे सहकार्य होत नाही. मजुरांना कारखान्यावर थांबण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी व्हिडीओमधून केले आहे.मात्र कारखान्यावर काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी धनु भाऊ एक वेळ उसाच्या फडामध्ये आणि कारखान्यांमध्ये जाऊन पाहावं मग खरंच कारखान्यावर थांबण्यासारखी परिस्थिती आहे का हेही समजून घ्यावं. इकडे पोटचे गोळे गावाकडे उपाशी असताना दुसरीकडे ऊसतोड मजूर आज अडकून पडले आहेत या मायलेकरांची भेट घडून देण्याच काम धनंजय मुंडे करतील का हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

Usetodi01_1  H
 
दुसरीकडे ऊसतोड मजुरांची "माय" म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे आज ए सी च्या घरांमधून सल्ला देत आहेत त्यांचे असलेल्या व्हिडिओ भाऊ असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे अर्ज आणि ट्विटरवरून फेसबुकवरून विनंती करत आहेत प्रत्यक्ष लोकनेत्यांचा वारसा चालवायचा असेल तर बांधावरती फडावर जाऊन ऊसतोड मजुरांचा प्रश्न समजून घेणं हे ताई साहेबांनी समजून घ्यायला हवं फक्त राजकारना साठी नाही तर ऊसतोड मजुरांचे दायित्व सांभाळण्याची जबाबदारी तुम्ही ओळखायला पाहिजे कदाचित तुम्ही आता विरोधी पक्षात असाल मात्र मुंडे साहेबांनी हयात असताना विरोधी पक्षात राहून ऊसतोड मजुरांच्या बाबतीमध्ये केलेला संघर्ष विसरलात की काय? सत्तेमध्ये असून कारखानदारीच्या विरोधात जाऊन ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडवले होते. मग आज तुम्ही कोरोना च्या संकटापासून स्वतःची सुटका करून घेत आहात मात्र लाखोंची हजारो लेकरं रस्त्यावर ठेवून घरांमध्ये बसून सल्ला देत नसते तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष प्रश्न सोडवत असते याची जाणीव ठेवून पंकजा मुंडे यांनीही या ऊसतोड मजुरांच्या बातमीमध्ये समजून घ्यायला हव!
 
बीड जिल्ह्यातून तब्बल दोन ते अडीच लाख ऊसतोड मजूर खेड्यापाड्यातून वाड्या वस्ती दांड्यावरून पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जातात, कुठल्याही मजुराची आरोग्याची तपासणी केली जात नाही, त्याचा विमाही काळजात नाही, आरोग्याच्या सुविधा तर दूरची गोष्ट राहण्याची खाण्याची पिण्याची परवड असतेच, ऊसतोड मजूर महामंडळ फक्त नावालाच आहे, अद्याप ऊसतोड मजूर किती आहेत याची नोंद महामंडळाकडे नाही, आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे ऊसतोड मजूर महामंडळाचे सर्वेसर्वा आहेत मात्र तेही ठोस उपाययोजना करत नाहीत.
 
प्रत्यक्षात ऊसतोड मजुरांची वास्तव पाहिले तर काही कारखान्याचा पट्टा पडलेला आहे काही कारखाने सुरू आहेत यामध्ये बंद झालेल्या कारखान्या वरून निघालेली ऊसतोड मजूर अद्याप घरी पोहोचले नाहीत वारंवार चेक पोस्ट आणि पोलीस प्रशासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात गावात शहरात आडवले जाते त्यांच्याकडे परवानगी नाही, मुलांना सांभाळण्यासाठी काहीजण कारखान्यावर निघाली मात्र गाडीच नाही तर ते अडकून पडले काहीजण तर शेकडो किलोमीटर पायपीट करून घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत रस्त्यावर भीक मागत चालत यावे लागत आहे हे वास्तव आहे, तर अर्ध्यापेक्षा जास्त उसाच्या फडामध्ये तोडणीचे काम करत आहेत, त्यांची मुले हंगामी वस्तीग्रह मध्ये दोन टायरची जेवण घेत होते मात्र शाळा बंद केल्या पासून अंगावरती काही बंद आहेत त्यांच्या जेवणात काही प्रश्न खूप मोठा आहे आजी आजोबा थकलेल्या म्हाताऱ्या माणसांकडून किती अपेक्षा करणार म्हणून फळा मध्ये ऊस तोडणी करणाऱ्या ऊसतोड मजुरांचा जीव टांगणीला लागलेला आहे यातच कारखानदारांकडून शक्ती करत संपूर्ण ऊस तोडण्याची धमकी दिली जात आहे तरच कमिशन आणि वाहन खर्च मिळेल असाही दम दिला जात आहे यामध्ये ऊसतोड मजूर भरडून निघत आहेत काही ठिकाणी तर ऊसतोड मजुरांवर मुजोरपणा ही व दंडेलशाही केले जात आहे यातच ऊसतोड मजूर महिलांना आक्रोश करत काही कारखान्यांमध्ये आता बंदची हाक दिली आहे या भगिनींच्या आक्रोश आकडे सरकार लक्ष देईल का ? ताई भाऊ आणि अक्का दादा हे नेते जागा सोडतील का ऊसतोड मजुरांची अश्रू पुसण्यासाठी समोर येतील का हे पाहणे गरजेचे आहे मात्र वास्तव भयाण आहे जिवाच्या आकांताने रडणाऱ्या माणसांकडे खरंच लक्ष देणे गरजेचे आहे.