कार्यालये बंद नाहीच; ट्रेन, बस सुरूच राहणार - मुख्यमंत्री

जनदूत टिम    17-Mar-2020
Total Views |
मुंबई : राज्यातील सरकारी कार्यालये सुरूच राहणार आहेत. ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. अत्यावश्यक बस आणि रेल्वे सेवा सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालये बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

mantralaya_1  H 
 
तसंच लोकल आणि बससेवा अत्यावश्यक असल्यानं बंद होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. सरकारी कार्यालयं सात दिवस बंद राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राज्यातील सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत, तसंच लोकल आणि बस सेवा ही अत्यावश्यक आहे. त्यामुळं तीही बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सरकारी कार्यालयांतील कर्मचारी संख्या ही ५० टक्क्यांवर आणण्याबाबत विचार सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा झाली. राज्यात एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. हा राज्यातील पहिला बळी आहे. राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं राज्यातील जनतेनं स्वतःच काळजी घेण्याची गरज आहे. राज्य सरकारनं आवश्यक ती पावलं उचलली आहेत. जनतेनंही सहकार्य करावं. सहकार्य केल्यास संभाव्य धोकाही टळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.